निपाह व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याला तातडीने आरोग्यासंबंधी उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. तसंच मृता मुलाचे कुटुंबीय, नातेवाईक, गाव आणि त्याच्याशी संबंधी क्षेत्रात सक्रिय रुग्ण शोधण्याचा सल्ला केंद्राने केरळ सरकारला दिला आहे. केरळमध्ये गेल्या १२ दिवसांत पीडिताच्या संपर्कात आलेल्या सर्वांचं ट्रेसिंग करावं. तसंच संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करावं आणि जास्तीत जास्त नमुने गोळा करून त्याची चाचणी करावी, असं केंद्राने म्हटलं आहे.
२०१८ मध्येही केरळच्या कोझिकोड आणि मलपूरममध्ये निपाह व्हायरसचे रुग्ण आढळले होते. दक्षिण भारतात निपाहचा पहिला रुग्ण हा केरळच्या कोझिकोडमध्ये १९ मे २०१८ रोजी आढळला होता. यानंतर १ जून २०१८ मध्ये संसर्गामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.
दुसरीकडे, देशात करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही रोज ४० ते ४५ हजारांदरम्यान आढळून येत आहे. यातील ६० ते ६५ टक्के रुग्ण हे फक्त केरळमधील आहेत. अशातच निपाह व्हायरसमुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times