मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज (Coronavirus) बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्या मात्र किंचित घटली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची (covid Active Patients) संख्या देखील थोडी घटली आहे. या बरोबरच आज झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या किंचित वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी एकूण स्थिती पाहता राज्यात करोनावर नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत असल्याने राज्याला आज दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ०५७ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १३० इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ५ हजार ९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ५०६ इतकी होती. तर, आज ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६४ इतकी होती. (maharashtra registered 4057 new cases in a day with 5916 patients recovered and 67 deaths today)

आज राज्यात झालेल्या ६७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ९४ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ०९५ वर आली आहे. काल ही संख्या ५२ हजार ०२५ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ३२५ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार २७३ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ६०३ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ७०१ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार २५१ इतकी आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ८९६ वर खाली आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईत उपचार घेत आहेत ४,००३ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार ००३ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०८७, सिंधुदुर्गात ९३०, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८४९ इतकी आहे.

नंदूरबार, धुळे आणि वर्ध्यात प्रत्येकी दोन सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४७७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५६ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९६ वर आली आहे. राज्यात नंदुरबार, धुळे आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण असून हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

क्लिक करा आणि वाचा-

२,९९,९०५ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४८ लाख ५४ हजार ०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८६ हजार १४७ (११.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार ९०५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ००७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here