साकीनाक्यातील ही घटना अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक अशी घटना आहे. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचे स्थान वरचे आहे. या घटनेवरून आता गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपींना अटकही केलेली आहे, असे राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर नक्कीच आहे, शिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचे राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावणाऱ्या असतात, असे म्हणत त्यांनी विरोधकांना संयम पाळण्याचे आवाहन केले.
साकीनाका बलात्कारप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आता काही ठिकाणी माणसे जमवण्याचे प्रकार सुरू आहेत. हे टाळणे गरजेचे असून या घटनेतील आरोपींना नक्की कठोर शासन होईल, असे राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांना या पीडित महिलेचा जबाब घेता आला नाही. तिचा जबाब घेता आला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या लिंकच्या माध्यमातून मुख्य आरोपीला अटक केली आहे. मात्र मी सकाळपासून पाहात आहे की विरोधी पक्षाचे नेते आणि नेत्या सरकारवर आरोप करत आहेत. त्यांनी भूमिका नक्कीच मांडली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील या सर्वांनी या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवला आहे. आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, मग ती शिक्षा फाशीही असेल. ती होण्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे आणि मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील, असेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times