औरंगाबादः मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज () औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध विकास कामांची घोषणा केली आहे. तसंच, जिल्हा परिषदेच्या इमारतीचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवेदेखील () कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी रावसाहेब दानवेंनी तुफान फटकेबाजी केली. त्यामुळं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर यांनी मंचावर तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांसमोरच दानवेंनी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे. ‘सोलापूरपासून- धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाही तर रावसाहेब दानवे यांना मतदान करु नका, असं अब्दुल सत्तार यांना सांगितलं होतं. मग मी पण म्हणालो सिल्लोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करु नका,’ असा मिश्किल टोला लगावला आहे.

वाचाः

दानवेंनी सांगितला धमाल किस्सा
‘मी जिल्हा परिषदेचा सदस्य असताना नांगराच्या चिन्हावर निवडून आलो होतो. मला तेव्हा ६५ रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला. मला मॅनेजर चेक देईना. त्यांनी मला ओळखलेच नाही. कारण मी सभापती असेन असं त्यांना वाटत नव्हतं. एवढा लहान सभापती असतो का?, असं बँक अधिकारी म्हणाले. शेवटी माझी ओळख करुन द्यावी लागली,’ असा किस्सा रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here