मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले आहेत का या प्रश्नावर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत सर्व काही शांत आहे. अलबेल आहे. कोणतंही वादळ नाही. कमालीची शांतता आहे, असं उत्तर दिलं आहे. तसंच, ‘त्या विधानाने कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पणे हे सरकार तीन वर्ष चालणार आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, हे आमचे पक्षप्रमुख आहेत. तसेच ते माझे व्यक्तिगत मित्रंही आहेत. त्यामुळं आमच्यात गप्पा झाल्या. त्यांना वेळ असेल तेव्हा मी जाऊन भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो. तसंच, मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो या चर्चा आतमध्ये त्या बाहेर कशाला सांगायच्या?,’ असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.
वाचाः
‘मुख्यमंत्र्यांनी ते विधान अचानक केलेलं नाही. जे माजी आहेत, त्यांनी भावी म्हावं म्हणून त्यांनी ते विधान केलं आहे. काही लोकं महाविकास आघाडीशी संपर्क ठेवत आहेत. अनेक लोकं येणार आहेत. मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले नाहीत ते केंद्रातील नेते आहेत. मुख्यमंत्र्यांचं ते विधान महाराष्ट्रातील नेत्यांबाबत होतं,’ असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times