काल मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथे आठवडी बाजार असल्याने भवानीपूर येथील सुधीर सुकुमार रॉय हे भावणीपूरवरून दुचाकीवर भाजीपाला घेऊन गोमणीकडे जात होते. महावितरणच्या कामात मजुरी करून भावणीपूरकडे अजय निरोध ढाली आणि बाबू तारक बाच्छाळ दोघेही परत येत असताना दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान आंबटपल्ली जवळ दोन दुचाकींचा समोरासमोर धडक झाली.
या तिघांनाही जखमी स्वरूपात ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, सुधीर सुकुमार रॉय त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल व्हायचा अगोदरच त्याने रात्री कोठारीच्या जवळपास अखेरचा श्वास घेतला.
अजय निरोध ढाली आणि बाबू तारक बाच्छाळ या दोघांवर मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रात्री उशिरा झाल्याने सुधीर रॉय यांचा आज मुलचेरा येथे शवविच्छेदन करण्यात येत असून पुढील तपास मुलचेराचे ठाणेदार प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times