मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लॉण्ड्रिग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आता राज्याच्या गृहविभागाचे उप सचिव यांना समन्स बजावलं आहे. चौकशीसाठी आजच ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. (ED summons Maharashtra deputy home secretary )

गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयनं सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’नंसुद्धा देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे. ‘ईडी’नं आत्तापर्यंत देशमुख यांना पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.

वाचा:

अनिल देशमुख यांच्या शोधासाठी ‘ईडी’नं आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ‘ईडी’ची तीन पथकं एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. लूकआऊटमुळं लवकरच परराज्यात देखील ‘ईडी’कडून शोध सुरू होईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं. असं असूनही अद्याप अनिल देशमुख ईडीसमोर आलेले नाहीत. त्याऐवजी त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग पत्करला आहे.

अनिल देशमुख ईडीसमोर आले नसले तरी त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी ईडीनं सुरू केली आहे. देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सोमवारी ईडीनं चौकशी केली. आता ईडीनं कैलाश गायकवाड यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here