गांधी भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ‘परमबीर सिंग यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमबीर यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी भाजपवाल्यांनी मोदींना भेटावं!
मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीनं व पुरामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटानं हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावीच, त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करावी, असं आवाहन पटोले यांनी केलं.
वाचा:
‘मे महिन्यात कोकण किनारपट्टीसह गुजरातलाही तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. कोकणात या चक्रीवादळानं अपरिमित हानी केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला आणि बैठक घेऊन गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. शेजारच्या महाराष्ट्रात नुकसान झालं असतानाही पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली नाही. महाराष्ट्राशी केंद्र सरकारनं दुजाभाव केला. राज्यातील भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी केली आहे, ती रास्तच आहे. पण केंद्र सरकारकडे जाऊन या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल,’ असं पटोले म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times