इस्लामाबाद: पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तानच्या भागात शनिवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलाचे पाच जवान ठार झाले. यातील चार जवान फ्रंटिअर कोरचे आहे. तर, अन्य एक जवान लेव्हिस फोर्सचा उपनिरिक्षक आहे. या भागात तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत टीटीपीच्या एका कमांडरचा खात्मा करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी टीटीपी आणि पाकिस्तान सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचे म्हटले गेले होते. टीटीपीने शस्त्रसंधी लागू केली असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी प्रकाशित केले होते. मात्र, टीटीपीने हे वृत्त फेटाळून लावत शस्त्रसंधी जाहीर केली नसल्याचे म्हटले. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.

पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी संघटनांना आश्रय; पाच संघटनांकडून भारतविरोधी कारवाया

बलुच बंडखोरांनी जिन्नांचा पुतळा बॉम्बने उडवला; जून महिन्यात झाले होते लोकार्पण
एका परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते की, पाकिस्तानमधील तालिबानी गटांसोबत शांततेबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. या तालिबानी गटातील काहीजण आमच्यासोबत चर्चा सुरू आहे. टीटीपीमधील काही गटांसोबत चर्चा सुरू असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here