हायलाइट्स:
- २ अल्पवयीन बहिणींवर सतत सुरू होते बलात्कार
- नवी मुंबईतून जालन्यात पोहचल्या अन्…
- ०१ ऑक्टोबर रोजी या दोघी नराधमाच्या तावडीतून पळाल्या
अधिक माहितीनुसार, महिन्याभरात या दोन अल्पवयीन मुलीवर अविनाश जोगदंड, त्याचा भाऊ शुभम जोगदंड, दीपक राणा आणि गणेश काकडे अशा चौघांनी सतत बलात्कार केला. मात्र ०१ ऑक्टोबर रोजी या दोघी या त्याच्या तावडीतून सुटका करून औरंगाबादला पळून गेल्या. त्यानंतर औरंगाबादच्या सिडको पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून काल रात्री हा गुन्हा जालना पोलिसांकडे वर्ग केला.
पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्यासह कदीम जालना पोलीस, पिंक पथक यांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन करून या अत्याचार प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली. तर मुख्य सूत्रधार अविनाश जोगदंड हा नांदेडहून जालन्याकडे रेल्वेने येत असल्याची माहिती मिळताच पहाटे जालना रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्यालाही अटक करण्यात आली.
यातील आरोपी गणेश काकडे आणि शुभम जोगदंड या दोघांना जालना शहरातील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे. कदिम जालना पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times