ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारताची फलंदाजी ढेपाळली. पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळी वगळता भारताची आघाडीचे फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले नाहीत.
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केली. मयांकला ट्रेंट बोल्टने ७ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर पृथ्वीने पुजारासोबत ५० धावांची भागिदारी केली. पण तो ही ५४ धावावर बाद झाला. पृथ्वी पाठोपाठ विराट कोहली ३ धावा करून माघारी परतला. तर अनुभवी अजिंक्य रहाणेला टीम साऊदीने ७ धावांवर बाद केले. राहाणे बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद ११३ अशी होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times