हायलाइट्स:
- केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा दिल्लीत
- गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट
- चौकशीत सहकार्य करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश
अजय मिश्रा दिल्लीत
यावेळी, अमित शहा यांनी अजय मिश्रा यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. लखीमपूर हिंसाचारानंतर पहिल्यांदाच अजय मिश्रा दिल्लीत दाखल झाले आहेत.
अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यानं गाडीतूनच गर्दीवर गोळीबार केला. त्यानंतर गाडीनं चार जणांना चिरडलं. वाहनावरचा ताबा सुटल्यानं गाडी रस्त्यावरून खाली पलटली. या दरम्यान मंत्र्यांच्या मुलानं गाडीतून उतरून लोकांना बंदुकीचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला, असं उपस्थितांनी म्हटलंय.
आशिष मिश्राच्या अटकेची मागणी
लखीमपूर हिंसाचारानंतर काँग्रेससहीत इतर विरोधकांनी राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांच्याकडूनही अजय मिश्रा यांना पदावरून हटवण्याची आणि आशिष मिश्राच्या अटकेची मागणी करण्यात आलीय.
एफआयआर विरुद्ध एफआयआर
अजय मिश्रा आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर मिश्रा यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात येणार का? याकडे अनेकांचं लक्ष आहे. याच दरम्यान मिश्रा यांच्याकडून शेतकऱ्यांच्या एफआयआर विरुद्ध दुसरी एफआयआर दाखल करण्यात आलीय. भाजप कार्यकर्ते सुमित जयस्वाल यांनी ही एफआयआर दाखल केलीय. यामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तर अज्ञातांविरोधात हत्या, मारहाण आणि हिंसाचार अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी, प्रियांका गांधींना लखीमपूरला जाण्याची परवानगी
दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या गृह विभागाकडून काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासहीत तीन विरोधी नेत्यांना लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडित शेतकरी कुटुंबांची भेट घेण्यासाठी परवानगी देण्यात आलीय. लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणातील केवळ दोन पीडित कुटुंबांची भेट घेण्यास त्यांना परवानगी देण्यात आलीय. या भेटीत राहुल, प्रियांका यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हेदेखील असतील. उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रियांका गांधी यांना मुक्त करण्यात आलंय. राहुल गांधी अगोदर लखनऊहून सीतापूरला जाऊन अगोदर प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दोघंही लखीमपूर खीरीकडे रवाना होतील. योगी आदित्यनाथ सरकारनं विरोधी पक्षांच्या प्रत्येकी पाच सदस्यांना लखीमूपर जाण्याची परवानगी दिलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times