हायलाइट्स:

  • ड्रग पार्टीवरील छापेमारी बनावट असल्याचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आरोप.
  • या कारवाईत मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी आरोपींना पकडून नेत असल्याचे दिसत आहेत- मलिक.
  • भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असून या मागे भाजप असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

मुंबई: पदार्थविरोधी विभाग, म्हणजे NCB (NCB) मुंबईच्या समुद्रात क्रूझवरील ड्रग पार्टीवर (drugs party) केलेली कारवाई ही पूर्णपणे बनावट असल्याचे सांगत यामागे भाजप असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. या कारवाईत मनीष भानुशाली (मनीष भानुशाली) व्हिडिओ च्या. पी. गोसावी (KP Gosavi) हे एनसीबीचे अधिकारी नसलेले लोक कारवाई करताना दिसत आहेत. भानुशाली हा भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे. तर गोसावी हा खासजी हेर असल्याचा तो दावा करत आहे. भानुशालीचे फोटो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नड्डा देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांच्यासोबत आहेत, अशी माहिती देतानाच मनीष भानुशाली आणि एनसीबीचे संबंध काय आहेत हे एनसीबीला सांगावे लागेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (who are मनीष भानुशाली आणि केपी गोसावी ड्रग पार्टीच्या छाप्यात मंत्री स्पष्ट करतात नवाब मलिक)

मंत्री नवाब मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या काही फोटो आणि व्हिडिओच्या आधारे भाजपसह एनसीबीवर हे आरोप केले आहेत. क्रूझवरील पार्टीतून ज्यांना एनसीबीने ताब्यात घेतले अशांचे व्हिडिओ आणि फोटो एनआयएने प्रसिद्ध केले.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानची अटक बोगस? भाजपचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या वेषात; ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट

पीएम मोदींसह भानुशाली

मनीष भानुशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असताना

मलिक यांनी माहिती देताना सांगितले की, २१ तारखेला मनीष भानुशाली दिल्लीत होता. तो काही मंत्र्यांच्या घरी होता. २२ तारखेला तो गुजरातमधील गांधीनगर येथे मंत्रालयात होता. तेथे २८ तारखेपर्यंत त्याच्या मिटिंग होत राहिल्या. २१-२२ तारखेला गुजरातमधील मुंद्रा बंदरात ३००० हजार की २७ कोटींचे ड्रग पकडले. मग भानुशाली दिल्लीत कोणाला भेटत होता, तो गुजरातमध्ये कोणत्या मंत्र्यांसोबत बसत होता. २८ तारखेपर्यंत तो गुजरातच्या मंत्रालयात काय करत होता. २८ तारखेला तो पुन्हा मुंबईला आला. पुन्हा १ ऑक्टोबरला गुजरातला गेला आणि मंत्रालयात राणा नावाच्या मंत्र्याला भेटला. आणि त्यानंतर ३ तारखेला क्रूझवरील छापेमारीत लोकांना अटक करतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे एनसीबीला द्यावी लागतील. भानुशालीचे गुजरात ड्रगशी काय संबंध आहे हे देखील एनसीबीला सांगावे लागेल. क्रूझवरील छाप्याचा गुजरात ड्रग प्रकरणाशी संबंध असून NCB भाजपच्या लोकांना हाताशी धरून लोकांना अटक करत आहे, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.

वाचा:‘एनसीबीचं पुढचं टार्गेट अभिनेता शाहरूख खान’; ‘या’ मंत्र्यांचा सनसनाटी दावा
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबी कार्यालयात नेण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यात डोक्यावर केस नसलेली एक व्यक्ती आर्यन खानला हाताने पकडून घाईघाईत अटक करून नेत आहे. तीच व्यक्ती नंतर आर्यन खानसोबत सेल्फी घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र हा एनसीबीचा अधिकारी नसल्याचे दिल्ली एनसीबीने स्पष्ट केले. या व्यक्तीचा एनसीबीशी कोणताच संबंध नाही. मग ही व्यक्ती कोण आहे हा प्रश्न आहे. मग ही व्यक्ती आर्यन खानला फरफटत एनसीबी कार्यालयात कसे काय घेऊन जात होता हे एनसीबीला सांगावे लागेल, असे मलिक म्हणाले.

क्रूझवरील रेव्ह पार्टी छापा बनावट, अधिकाऱ्यांच्या वेषात भाजप कार्यकर्ते; ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट

मात्र या व्यक्तीचीही माहिती आम्ही काढली असून गोसावी क्लेम करतो की तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. गोसावी फ्रॉड आहे. गोसावीवर पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. फेसबुकवर वानखेडे सोबत फोटो होता. रविवारनंतर स्टेटस बदलले. पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरतो हत्यारे घेऊन फोटो काढतो, अशी माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग पार्टी प्रकरणात आणखी कोणाच्या अडचणी वाढणार?; आता मुंबई पोलिसही करणार चौकशी

भारतीय जनता पक्ष संपूर्ण एनसीबीचे कार्यालयाचा उपयोग लोकांना बदनाम करण्यासाठी करत आहे. आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना छापेमारी करण्याच्या कामी वापर करत आहे. जो मनीष भानुशाली पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, नड्डा यांना थेट भेटतो त्याचे भाजपत पद काय आहे?, हा त्यांचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे का? हे सांगावे. मनीष भानुशालीला भाजपने कोणती जबाबदारी दिली आहे याचाही खुलासा भाजपने केला पाहिजे.

मनीष भानुशाली आणि केपी गोसावी

मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी

‘वर्षभरापासून भाजप महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदमान करत आहे’

गेल्या १ वर्षांपासून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या सरकारला आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम करत आहे, बनावट छापे मारत आहे आणि ३ तारखेचा सगळा ड्रामा हा बनावट आहे आणि असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here