हायलाइट्स:

  • आणखी एका शेतकऱ्याने आयुष्य संपवलं
  • पत्नी आणि दोन मुलं वाऱ्यावरून सोडून उचललं टोकाचं पाऊल
  • कमवता व्यक्ति गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का

गोंदिया : हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. याचा थेट परिणाम बळीराजावर होतो. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गोंदियामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातिल रूगाटोला येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयचंद विश्वनाथ पंधरे वय ४४ वर्ष असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी जयचंद अनेक वर्षांपासून सततचे नापिक व वाढनारे कर्ज यांच्या चिंतेत होते. शेतात मोठ्या आशेने धानपिक लावले खरे. मात्र, त्यात पावसाचा मार आणि मावा तुडतूडा सारख्या रोगाने पिक नासण्याच्या स्थितित आले. आता कर्ज फेडायचे कसे ह्या चिंतेत असतांना अखेर त्यांनी आपल्या शेतात झाड़ाला गळफांस घेत आत्महत्या केली आहे.

भाजपचे १०५ आमदार निवडून आले, पण…; शिवसेनेनं गणितच मांडलं

घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सालेकसा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा करून अहवाल दाखल केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा असा छोटासा परिवार आहे. कमविता व्यक्ती गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, ते गेल्यानंतर…; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here