हायलाइट्स:
- आर्यनमुळे शाहरुखच्या कमाईवर परिणाम
- बायजूस कंपनीने जाहिराती केल्या बंद
- पुढील जाहिरातींच्या प्रदर्शनावरही लावली बंदी
आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण थांबवून परदेशातून भारतात परतला होता. त्यानंतर शाहरुखची अनेक कामंदेखील रखडली आहेत. यात भर म्हणून बायजस या कंपनीने शाहरुखच्या जाहिरातींवर रोख लावत त्यांचं प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझं कुटुंब प्रतिष्ठित कुठेही पळून जाणार नाही…, जामिनासाठी आर्यन खानने मांडली बाजू
शाहरुख बायजूस या शैक्षणिक अँपचा ब्रॅण्ड एम्बॅसिडर आहे. बायजूसच्या प्रत्येक जाहिरातीत शाहरुखचा समावेश असतो. परंतु, आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुखला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यासोबतच बायजूस देखील नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. नेटकरी शाहरुखसोबत बायजूसला देखील ट्रोल करू लागले. त्यामुळे कंपनीने शाहरुखच्या सगळ्या जाहिराती बंद केल्या. इतकंच नाही तर त्याच्या तयार असलेल्या जाहिराती देखील प्रदर्शित होण्यापासून थांबवल्या. बायजूस हा शाहरुखच्या स्पॉन्सरशिप डील्स मधील सगळ्यात मोठा ब्रॅण्ड होता. बायजूसकडून शाहरुखची चांगली कमाई होत होती. या ब्रॅण्डशाहरुखला वर्षाला ३ ते ४ कोटी रुपये मिळायचे.

शाहरुख या कंपनीसोबत २०१७ पासून काम करत होता. यासोबतच आयसीआयसीआय बँक, रिलायन्स जिओ, दुबई टुरिझम, हुंदाई यांसारख्या तब्बल ४० कंपन्यांसोबत शाहरुख जोडलेला आहे. सध्या आर्यनला जामीन मिळत नसल्याने शाहरुखही चिंतेत आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक स्थितीसोबत मानसिक स्थितीवर देखील प्रभाव पडत आहे.
कशी झाली अटक? आर्यन खानने कोर्टाला सांगितलं काय घडलं त्या दिवशी
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times