कणकवलीत महाविकास कार्यकर्ते रस्त्यावर उतरेल आणि बाजारपेठेत फेरफटका मारत दुकान बंद करायला लावली. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांध्यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होते
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्गात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठा सुरळीत सुरू आहेत. इतकंच नाहीतर एसटी वाहतुकीवरदेखील बंदचा कोणताही परिणाम झाला नसून जिल्ह्यात सर्वत्र दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत. उत्तर प्रदेश लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीची बैठक घेत जनतेला बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी ९ ते १ पर्यंत बंद करण्याचे जाहीर केले होते. याचा कोणताही परिणाम झालेला नसून महाविकास आघाडीच्या बंदला पुरता फज्जा उडाल्याचेचं चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times