‘देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा सत्तेचा माज आलेला केंद्रीय मंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतो…यात ५ शेतकरी ठार होतात… हा निषेधाचा विषय नाही का?’ असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
‘गुन्हेगाराला जात, धर्म, पक्ष नसतो. केवळ फडणवीस यांच्या पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालायचं हे योग्य नाही. त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहणार नाही,’ असं शेट्टी म्हणाले. ‘आम्ही असं कधीही केलेलं नसून ज्यावेळी मावळ कांड घडलं त्यावेळी देखील आम्ही निषेध केला. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या नंतर आम्ही विरोधच केला. आता लखीमपूरमध्ये घटना घडली आहे, त्याचाही आम्ही विरोधच करणार आहे, कारण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत,’ असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times