म्यानमारच्या लष्कराने एक फेब्रुवारी रोजी सत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर लोकशाहीवादी नागरिक, संघटना, राजकीय पक्ष आणि लष्करामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. म्यानमारच्या लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली.
असिस्टेंस एसोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्सच्या (AAPP) आकडेवारीनुसार, लष्कराने सत्ता उलथवल्यानंतर आठ महिन्यांच्या कालावधीत लष्कराने किमान ७२१९ जणांना अटक केली आहे. तर, आंदोलने, निदर्शनात लष्कराच्या कारवाईत ११६७ जणांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारचे लष्कर आणि विद्रोही गट यांच्यातील संघर्ष वाढत असून चकमकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times