यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आभासी पध्दतीने तर देवनाथ मठाचे पिठाधिश श्री जितेंद्रनाथ महाराज सह आदी मान्यवर देखील उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रवींद्र गणोरकर व संजय जोशी यांना तीस वर्षांपूर्वी इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेट निर्मितीची संकल्पना सुचलीय त्यासाठी त्यांनी तबल तीस वर्ष परिश्रम घेतले.
कमी जागेत, कमीत कमी खर्चात, कमी पाण्यात या बायोटॉयलेटचा उपयोग करता येतो.या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा बायोटॉयलेट सहज नेता येतो. तसेच शेतीसाठी या शौचालयाच्या पाण्याचा वापर करता येतो जनेकरून शेती सुपीक होईन. ग्रामीण भागातील या संशोधकानी तयार केलेल्या या प्रोजेक्टला देशातील शासनाच्या नामांकीत संशोधक संस्थांनी परवानगी देऊन प्रमाणपत्र दिले आहेत.
इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेटची निर्मिती हे प्रदूषण व रोगराई मुक्त भारत करण्याच्या संकल्पनेतून झाली असल्याचं या संशोधकांनी सांगितलं.घरोघरी अशा प्रकारचे टॉयलेट लावल्यास लोकांचा खर्च वाचू शकतो तसेच विविध रोगांना आळा घालता येऊ शकतो अस या संशोधकानी संगीतल.तसेच घरी सेफ्टी शौचालयाची निर्मिती करायची झाल्यास मोठा खड्डा खोदावा लागतो परन्तु या टॉयलेट साठी मोठा खड्डा ही खोदावा लागत नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times