हायलाइट्स:
- १०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार
- ईडीने चौकशीसाठी आणखी एकाला घेतलं ताब्यात
- चौकशीनंतर होणार महत्त्वाचा खुलासा?
या कथित भ्रष्टाचार प्रकरणात भावना गवळी यांचे निकटवर्तीय तथा व्यावसायिक भागीदार असलेल्या सईद खान यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या कबुली जबाबातून आदिवासी विभागात २३१ कोटी रुपयांचा खाऊ घोटाळा झाला असल्याची माहिती त्यांच्याकडून समोर येत आहे.
यामध्ये बाफनाच्या नॅसकॉफ कंपनीचा ५० टक्के व इतर साथीदारांचा ५०टक्के हिस्सा आहे. या प्रकरणाचा शेवट महाराष्ट्रातील एका प्रसिध्द मोठ्या सत्ताधीश राजकीय घराण्यापर्यंत जाईल, लवकरच हे नाव समोर येईल, असा दावा तक्रारकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात एकूण पाच जण सहभागी असून हिंगोली येथील एकाला ईडीकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तक्रारकर्ता हरीश सारडा यांनी वाशिम इथं बोलताना दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times