असदुज्जमां कमाल यांनी पुढे म्हटले की, आमचे देशवासिय धर्मांध नाही, आम्ही कधीही या ठिकाणी दहशतवादी वातावरण निर्माण होऊ दिले नाही. हिंदू, मुस्लिम, शीख व इतर घटकांनी मिळून दहशतवादी घटना आणि कृत्यांचा सामना केला आहे. कोमिल्लानंतरही विविध ठिकाणी हिंदू मंदिर, दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले. नौखाली आणि चांदपूरमध्ये चारजणांचा मृत्यू झाला. फेनी आणि कोक्सबाझारमध्येही हल्ले झाले.
बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्यासाठी शोक व्यक्त केला. हे हल्ले म्हणजे बांगलादेशमधील विविध धार्मिक समूहांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असून सुनियोजित कट रचून हे हल्ले करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, कोमिल्ला येथील दुर्गा पूजा मंडपांवर हल्ला झाल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. हा हल्ला करणारे कोणत्याही धर्माचे असोत, त्यांना शिक्षा होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times