त्यावर आरोपीने हिंसक प्रतिक्रिया दिली. ‘तुम्ही भैय्ये महाराष्ट्रात येऊन राज्य करणार काय? थांब तुला दाखवतो, तुला जिवंत सोडणार नाही,’ असं म्हणून त्याने त्याच्या हातातील तलवारीने डोक्यात वार केला. त्यावेळी खाली वाकून बचावासाठी दोन्ही हात डोक्यावर धरून तलवारीचा वार अडवला असता उजव्या हाताचे मधले बोट तुटून खाली पडले तसेच इतर तिन्ही बोटांना व डाव्या हाताच्या तळव्यावर गंभीर दुखापत झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, त्यापूर्वी हल्लेखोराने मध्यवस्तीतील दारूच्या गुत्त्यावर जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. दुकान चालकांना दमदाटी केली. दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर किसन वीर चौक चौकात असणाऱ्या वाईन शॉपमध्ये घुसून तेथील फर्निचरची व काचांची मोडतोड केली. दुकानात दहशत माजवत ग्राहकांना बाहेर काढलं व दुकान बंद करण्यासाठी धमकी दिली, अशी तक्रार सहा दुकानदारांनी पोलिसात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी जाऊन शहरात दहशत माजवणाऱ्या हल्लेखोराला ताब्यात घेतलं. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times