वृत्तसंस्था, पटनमथिट्टा

केरळमध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील दहा धरणांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. काक्की धरणाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शबरीमला यात्रा स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती केरळचे महसूलमंत्री के. राजन यांनी सोमवारी दिली. पटनमथिट्टा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर के. राजन, आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली. राज्यात २० ते २४ ऑक्टोबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे धरणात आणखी पाणी येण्याची शक्यता आहे.

मृतांची संख्या ३५ वर

केरळमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसप्रणित विरोधी आघाडीने पिनराई विजयन सरकारवर आरोप केले असून, सरकारने वेळेवर कृती न केल्याचा दावा केला आहे. केरळमधील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही राज्य सरकार कृती करण्यात का अपयशी ठरले, असा सवाल केला. मात्र सरकारने हे आरोप फेटाळले.

IMD Alert: केरळ, दिल्ली, उत्तराखंडात पावसाचा धुमाकूळ; सतर्कतेचा इशारा
Kerala Rains : केरळमध्ये पावसाने हाहाःकार, २१ जणांचा मृत्यू; ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट

उत्तराखंड, उत्तर प्रदेशात पावसाचा अंदाज

दरम्यान, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ‘सध्या दोन कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. त्यापैकी एक मध्य प्रदेशच्या नैऋत्येकडील भागात असून, दुसरे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये आहे. याशिवाय पश्चिमेकडील वातावरणीय बदलांमुळेही पाऊस पडत आहे. अफगाणिस्तानकडील भागात झालेल्या वातावरणातील बदलांमुळे सोमवारी दिल्ली आणि नजीकच्या परिसरांत पाऊस झाला आहे,’ असे हवामानशास्त्र विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ नरेशकुमार यांनी सांगितले.

amit shah : राष्ट्रीय सुरक्षेवर अमित शहांची ६ तास चालली बैठक, दिले महत्त्वाचे निर्देश
petrol and diesel : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यावरून केंद्र सरकारमध्ये खल

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here