भारतीय सूत्रांनी पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचा हा भारताविरोधात अपप्रचार असल्याचे भारतीय सूत्रांनी म्हटले. कोणताही देश दुसऱ्याच देशाच्या हद्दीत पाणबुडी पाठवत असेल तर पाणबुडी ही पाण्याखाली राहणार. पाकिस्तानचा आरोप खोटा असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले. भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या आरोपाबाबत अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले नाही.
पाकिस्तानी नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नौदल सातत्याने सागरी सीमेवर लक्ष ठेवले जात आहे. मार्च २०१९ मध्येदेखील भारतीय पाणबुडीने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला होता. या पाणबुडीला पाकिस्तानने नष्ट केले असते. मात्र, नौदलाने तसे काही केले नसल्याचे पाकिस्तानने म्हटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times