नवी दिल्लीः इटलीहून मायदेशात दाखल झालेले काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. यावर भाजपने राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय. इटलीवरून परतल्यानंतर करोनाची चाचणी केली का? हे आधी राहुल गांधींनी सांगावं. राहुल गांधींनी भारतात दाखल होताच करोनाची चाचणी करायला हवी होती, असं दक्षिण दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधुरी म्हणाले. इटलीत करोनाने थैमान घातले आहे. तिथे आतापर्यंत १०० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

हा साथीचा रोग आहे. अशा प्रसंगी नागरिकांमध्ये जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी करोनाची चाचणी करायला हवी होती, असं बिधुरी म्हणाले. राहुल गांधी यांनी हिंसाचार झालेल्या दक्षिण दिल्लीतील ब्रजपुरी इथल्या अरुण पब्लिक स्कूलला भेट दिली. हिंसाचारा ही शाळा पेटवली गेली. यावेळी राहुल गांधी यांनी हिंसाचारावरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. ही शाळा पेटवून द्वेष आणि हिंसेने हिंदुस्थानचं भविष्य संपवलं. हिंसा आणि द्वेष विकासाचे शत्रू आहेत. याने भारत मातेचा कुठलाही फायदा होणार नाही. एकजूट होऊन काम करणच योग्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी अलिकडेच इटलीहून परतलेत. आता विमानतळावर त्यांनी करोनाची तापसणी केलीय की नाही. नागरिकांमध्ये जाण्यापूर्वी तरी राहुल गांधींनी करोनाची चाचणी करायला हवी होती. हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असं म्हणत बिधुरी यांनी राहुल गांधींना टोला लगावला. भारतात आतापर्यंत २९ जणांना करोनाची लागण झालीय. यातील १६ जण इटलीचे पर्यटक आहेत. तर राहुल गांधींनी अलिकडेच विदेश दौरा केलाय, याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आलेली नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here