बेगुसराय, बिहारः ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावर गीतकार यांनी टिप्पणी केली होती. हिंसाचारात अनेकांची घरं जाळली, दुकानं लुटली गेली आणि अनेकांचा मृत्यू झाला. पण पोलीस फक्त एकाच व्यक्तीचा शोध घेत आहेत. योगायोग म्हणजे त्याचं नाव ताहीर हुसेन आहे, असं अख्तर म्हणाले होते. याच वक्तव्यवरून बिहारच्या बेगुसरायमध्ये राहणाऱ्या एका वकिलाने जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीत अख्तर यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे.
बेगुसरायचे दंडाधिकारी ठाकूर अमन कुमार यांनी स्थानिक वकील अमित कुमार यांची ही तक्रार दाखल करून घेतली आहे. तक्रारीत जावेद अख्तर यांच्याविरोधात १२४ अ (देशद्रोह), १५३ अ (प्रक्षोभक वक्तव्य ) आणि १५३ ब (चिथावणे ) अशा कलमांतर्गत तक्रार केली गेली आहे. दिल्ली हिसेंप्रकरणी जावेद अख्तर यांनी केलेल्या टिप्पणीच्या आधारावर ही तक्रार दाखल केली गेलीय.
२५ मार्चला होणार सुनावणी
वकील अमित कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर २५ मार्चला सुनावणी होणार आहे. अख्तर यांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावर केलेलं वक्तव्य हे जाती, धर्माच्या नावावर देशाची विभागणी करणारं आहे, असा आरोप अमित कुमार यांनी केलाय.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times