हिंगोली : यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. हाती आलेलं सोयाबीनचे पीक ऐन कापणीच्या वेळेला परतीच्या पावसाने हिरावून नेल आहे. कापूस, तूर, पिकांसह इतरही पिकांना मोठा फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपानसून फुलशेती लागवडीचे प्रमाण वाढत असल्याचे दिवसेंदिवस दिसून येत आहे. फुल शेतीपैकी सर्वाधिक झेंडूच्या फुलशेतीची लागवड केली जाते. जिल्ह्यात फुलशेतीचे मार्केट कुठेच उपलब्ध नसल्याने हैदराबाद, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू इतर राज्यांसह महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, औरंगाबादसह मुंबई ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल होत असतात.

एनसीबी अधिकाऱ्याच्या ‘त्या’ पत्राची चौकशी होणार?; अधिकारी म्हणतात….
मागच्या वर्षी करोनामुळे सर्वसण उत्सव आणि मंदिरे बंद असल्याने फुलशेतीला मागणी पाहिजे. त्या प्रमाणात नव्हती. मात्र, यावर्षी करोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे मंदिर खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा झेंडूच्या फुलशेतीला मागणी वाढली आहे. यावर्षी वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे झेंडूच्या फुलावरती करपा सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे.

फुलं टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणीदेखील करावी लागत आहे. त्याच बरोबर या करपा रोगामुळे उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळी उत्सवामध्ये झेंडूच्या फुलशेतीला मागणी वाढणार असून फुलांचे भाव देखील वधारण्याची शक्यता आहे.

बापरे! उद्धव ठाकरे घरी असताना कॉम्पलेक्समध्ये होता ८ फूट लांब अजगर, अन्…

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here