यंदा राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. विदर्भातसुद्धा मधल्या काळात सतत पंधरा दिवस सूर्याचे दर्शन सुद्धा झाले नाही. यामुळेच संत्र्याच्या देठावर बुरशीजन्य आजाराने हल्ला केला. संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यात भर पडली ती पांदण रस्त्याची. शेतापासून मुख्य रस्त्यावर वाहून जाणारा हा पांदण रस्ता या पावसाने पूर्णता चिखलाने माखलेला होता. त्यामुळे शेतातील माती रस्त्यावर आणायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांवर पुढे होता.
याच कालावधीत संत्राचे व्यापारी सुद्धा शेत मालाकडे दुर्लक्ष करू लागले होते. त्यामुळे हजारो क्विंटल संत्रा शेतात पडून सडला. जो संत्रा झाडावर राहाला त्याची प्रतवारी घसरली. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणारा संत्रा यंदा हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. संत्राच्या पैशावरच शेतकऱ्याचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, याच संस्थेने यंदा दगा दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नियोजन कोसळले आहे. महाविकास आघाडी सरकारने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times