इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताविरोधात मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे सध्या चित्र आहे. दिल्ली हिंसाचारानंतर इम्रान खान यांनी भारताविरोधात एकत्र येण्याचे आवाहन इस्लामिक देशांना केले आहे. काही दिवसांपूर्वी इराणने भारताचा निषेध केला होता. त्यानंतर आता इम्रान यांच्याकडून इतर देशांना भारताविरोधात बोलण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

इम्रान खान यांनी आणि भारतातील मुस्लिम आणि काश्मिरी जनतेवर होणाऱ्या शोषणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल इराण आणि तुर्कीच्या राष्ट्र प्रमुखांचे आभार मानले आहेत. त्याच वेळी जगातील इतर मुस्लिम राष्ट्रांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याबद्दल ही इम्रान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इम्रान खान यांनी ट्विट करून भारताविरोधात थयथयाट व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, मुस्लिम जगतातून भारतातील हिंसाचाराविरोधात फार कमीजणांनी आपला निषेध नोंदवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदू वर्चस्ववादी सरकारविरोधात पाश्चिमात्य देशांनी आवाज उठवला असल्याचे खान यांनी म्हटले.

इराणचे सर्वोच्च नेते खमनेई यांनी भारताविरोधात टीका केल्यानंतर इम्रान यांनी हे ट्विट केले आहे. भारतातील मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत इराणने केंद्र सरकारवर टीका केली होती.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here