याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेच्या जीवनात हा सण नवी ऊर्जा, प्रकाश, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळच्या वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीही दिवाळीच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दिव्याचा उजेड कोणत्याही भेदभावाविना सगळ्यांना प्रकाश देतो – हाच दीपावलीचा संदेश आहे. आपल्या माणसांसोबत दिवाळी असो, सगळ्यांची हृदय जोडणारी दिवाळी असो’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर बी डी मिश्रा आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा आग्रह केला.
‘महाराष्ट्र टाईम्स’कडूनही सर्व नागरिकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times