नवी दिल्लीः देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने नव्या सूचना जारी केल्या आहेत. चीन, दक्षिण कोरिया, इटली आणि जपान या देशांचा प्रवास टाळा, असं केंद्रानं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त करोनाचा ज्या देशांमध्ये अधिक प्रादुर्भाव झाला आहे त्या देशांचाही नागरिकांनी प्रवास करणं टाळावं, अशी सूचना आरोग्य विभागाने केली आहे.

कोरनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि इटली या देशांच्या नागरिकांनी भारतात येण्यासाठी तीन मार्चपूर्वी केलेले व्हिसा रद्द तात्काळ करण्यात आले आहेत. ज्यांना भारतात येण्याची आवश्यकता आहे त्यांनी नव्याने व्हिसासाठी भारतीय दुतावासात अर्ज करावा, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. चीनमधील नागरिकांचा नियमित व्हिसा ५ फेब्रुवारीपासून रद्द करण्यात आला आहे. ज्यांना भारतात यायचे आहे त्यांनी भारतीय दुतावासाकडे नव्याने अर्ज करावा, असं सांगण्यात आलंय.

ज्यांना भारतात यायचं आहे आणि त्यांनी इटली, दक्षिण कोरिया आणि चीन या करोना प्रभावित देशांचा दौरा केलाय त्यांनी संबंधित देशातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून करोना व्हायरसची चाचणी करून निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्रसोबत आणावे. त्यांना १० मार्चपासून व्हिसा देण्यात येईल. पण ही सुविधा तात्पुरत्या स्वरुपाची असेल, असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here