हायलाइट्स:
- अनिल देशमुख आज सुटणार का?
- ईडी कोठडीचा अखेरचा दिवस
- जामिन मिळणार का?
हे मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. सीबीआयने २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तपास सुरू केला होता. सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता.
देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केला आणि निलंबित पोलीस शिपाई सचिन वाजे याच्यामार्फत मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून ४.७० कोटी रुपये गोळा केल्याचा ईडीचा आरोप आहे. देशमुख यांनी यापूर्वी हे आरोप फेटाळले होते आणि एजन्सीचे संपूर्ण प्रकरण पोलीस अधिकाऱ्याने (वाजे) केलेल्या दुर्भावनापूर्ण विधानांवर आधारित असल्याचे म्हटले होते.
या प्रकरणी आणखी दोन जणांना अटक
या प्रकरणी ईडीने संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही अटक केली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पालांडे हे देशमुख यांचे स्वीय सचिव म्हणून काम करत होते, तर शिंदे हे देशमुख यांचे स्वीय सहाय्यक होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times