हायलाइट्स:

  • ‘आंदोलनात ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू पण सरकारनं संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत’
  • सत्यपाल मलिकांचा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा
  • इंदिरा गांधींचं उदाहरण देत मलिकांचा पंतप्रधान मोदींना सल्ला

नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदींना अडचणीत आणणारं वक्तव्य केलंय. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी आपण पदावरून दूर व्हायलाही तयार असल्याचा पुनरुच्चार सत्यपाल मलिक यांनी केलाय. यावेळी, बोलताना ‘दिल्लीचे नेते एखाद्या कुत्र्याच्या मृत्यूनंतरही शोक व्यक्त करताना दिसतात. परंतु, शेतकऱ्यांच्या मृत्यूनं त्यांना काहीही फरक पडलेला नाही’, अशी घणाघाती टीका आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रशंसक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यपाल मलिक यांनी केलीय. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नाही तर, शीख आणि जाट समुदायाशी शत्रुत्व न घेण्याचा सल्लाही आपण मोदी सरकारला दिल्याचं मलिक यांनी म्हटलंय.

जयपूरमध्ये ‘ग्लोबल जाट समिट’ला संबोधित करताना सत्यपाल मलिक बोलत होते. शेतकऱ्यांच्या मुद्यावर दिल्लीतील नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्यासाठी आपलं पद गमवावं लागलं तरी बेहत्तर, असं मलिक यांनी यावेळी म्हटलं. ‘राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही, परंतु माझे काही शुभचिंतक आहेत जे याच शोधात असतात की यांनी काहीतरी बोलावं आणि हटवण्याची संधी मिळावी’ असं मलिक यांनी म्हटलं. यानंतर, भाजपमधले हे नेते कोण? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

‘दिल्लीतल्या दोन – तीन नेत्यांनी मला राज्यपाल बनवलं. ज्या दिवशी ते म्हणतील की माझ्यामुळे समस्या निर्माण झाल्या आणि मला पद सोडण्यासाठी सांगितलं जाईल तेव्हा राजीनामा सोपवायला मी एक मिनिटही घेणार नाही’, असंही वक्तव्य मलिक यांनी केलंय.

Satya Pal Malik: गोव्यातलं भाजप सरकार भ्रष्ट, आरोप केल्यानं पदावरून हटवलं; मलिकांचा आणखीन एक दावा
अंबानी-आरएसएस संबंधित व्यक्तींकडून ३०० कोटींची लाच, सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट
farmers protest : ‘कोणतंही आंदोलन चिरडून शांत करता येत नाही’ सत्यपाल मलिकांच्या वक्तव्याने केंद्राची गोची
‘तब्बल ६०० मृत्यू झालेलं हे पहिलंच आंदोलन’

‘मी जन्मापासून राज्यपाल नाही. माझ्याजवळ जे काही आहे ते गमावण्यासाठी मी नेहमीच तयार असतो. परंतु, मी जबाबदारी नाकारू शकत नाही. मी पद सोडू शकतो परंतु, शेतकऱ्यांना पीडित अवस्थेत आणि पराभव होताना पाहू शकत नाही. देशात याअगोदर असं एकही आंदोलन झालेलं नाही ज्यात तब्बल ६०० मृत्यूंची नोंद झाली असावी’, असं म्हणत त्यांनी केंद्रानं लागू केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. ‘एखादा कुत्रा मेला तर दिल्लीच्या नेत्यांचा शोक संदेश येतो. परंतु, ६०० शेतकऱ्यांच्या शोक संदेशाचा प्रस्ताव लोकसभेत संमत झाला नाही’, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला आणखीन अडचणीत आणलंय.

Satya Pal Malik: ‘…तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही’, सत्यपाल मलिक यांच्यामुळे भाजपच्या डोकेदुखीत वाढ?
Satya Pal Malik: ‘मी राज्यपाल असताना श्रीनगरमध्ये घुसण्याची दहशतवाद्यांची हिंमत नव्हती’
lathicharge on farmers : ‘हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी’, मेघालयच्या राज्यपालांची मागणी
इंदिरा गांधींच्या हत्येचा उल्लेख

यावेळी बोलताना १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकांकडून झालेल्या हत्येचा उल्लेखही मलिक यांनी आपल्या भाषणात केला. ‘आपण पंतप्रधान मोदींना शीख आणि जाट समुदायाशी शत्रुत्व न घेण्याचा सल्ला दिला होता’, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. न्यूनतम समर्थन मूल्याची हमी देऊन या मुद्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, या आपल्या विधानावर त्यांनी पुन्हा एकदा जोर दिलाय.

नव्या संसद भवनावर वायफळ खर्च

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजने’वरही सत्यपाल मलिक यांनी टीका केलीय. ‘एका नव्या संसद भवनाऐवजी एखादं आंतरराष्ट्रीय महाविद्यालय उभारणं अधिक योग्य ठरेल’, असं म्हणत सेंट्रल विस्टावर वायफळ उधळपट्टी केली जात असल्याचं मत सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केलंय.

सत्यपाल मलिक यांना पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातच जम्मू – काश्मीर, गोवा आणि मेघालयच्या राज्यपालपदाची संधी मिळालीय.

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये ४ CRPF जवान ठार; जवानानेच केला घात
india china news : ‘विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी चीनला दाखवा’, काँग्रेसचा निशाणा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here