दरम्यान, या आंदोलनाची परवानगी घेतली नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. आंदोलनाकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. तोंडावर मास्क वापरले नव्हते. करोना निर्बंधांचे उल्लघन केले, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी कमलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कार्यकर्ते आनंद सपकाळे, विशाल त्रिपाठी, अजय जोशी जयेश ठाकूर, दीपक साखरे, जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, महिला कार्यकर्त्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे, रेखा कुलकर्णी या ११ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times