जळगाव : जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना देखील बुधवारी सायंकाळी भाजपाकडून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या पुतळ्याचं दहन करुन निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री नवाब मलिक यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड माफियांसोबत संबंध असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चा, जळगाव जिल्हा महानगरतर्फे बुधवारी टॉवर चौकात नवाब मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

जिल्हा बँक निवडणुकीत कॉग्रेसचा अभिमन्यू केला; जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांचा राष्ट्रवादीवर आरोप

दरम्यान, या आंदोलनाची परवानगी घेतली नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. आंदोलनाकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. तोंडावर मास्क वापरले नव्हते. करोना निर्बंधांचे उल्लघन केले, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी कमलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कार्यकर्ते आनंद सपकाळे, विशाल त्रिपाठी, अजय जोशी जयेश ठाकूर, दीपक साखरे, जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, महिला कार्यकर्त्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे, रेखा कुलकर्णी या ११ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here