सलमान खुर्शीद, शशी थरूर, पी. चिदंबरम हे नेते जाणूनबुजून हिंदू धर्माला बदनाम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप द्वेषाची विचारसरणी पसरवतात,’ हा आरोपही पात्रा यांनी खोडून काढला. हिंदू धर्मातील नागरिकांना विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचेही भाजपने म्हटले आहे.
पात्रा म्हणाले, ‘हिंदुत्वाबाबत बेजबाबदार विधाने करणे हा राहुल गांधींचा इतिहास आहेच; पण ती त्यांची संस्कृती आहे. संधी शोधून गांधी कुटुंब हिंदुत्वाला लक्ष्य करते आणि बदनाम करते. हिंदू पाकिस्तान, हिंदू तालिबान, हिंदू दहशतवाद असे शब्द थरूर, चिदंबरम ही मंडळी मुद्दाम वापरतात. दिग्विजयसिंह आणि मणिशंकर अय्यरही असाच हिंदूंबाबत अपप्रचार करतात. या सर्व वक्तव्यांना राहुल गांधी यांचाही पाठिंबा असतो. हिंदुत्वाबद्दल बोलायचे हे जन्मजातच आहे. गांधी कुटुंबाच्या रक्तातच हिंदूंबद्धलचा द्वेष भरला आहे. सलमान खुर्शीद हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा आयसिससोबत करतात, थरूर हिंदू तालिबान म्हणतात. दिग्विजयसिंहही वाट्टेल ते बरळतात. त्यामागे कोणतीही विचारसरणी नाही. मुद्दामहून हिंदूना लक्ष्य केले जाते.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times