त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून त्या दृष्टिकोनातून पोलिसांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांशी देखील यासंबंधी चर्चा झाली आहे ते सर्व राजकीय नेत्यांशी बोलून त्यांनासुद्धा हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन करणार आहेत. दरम्यान, हे आंदोलन करून त्याला हिंसक वळण देऊन काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे जनतेने आंदोलन शांततेत करावं असं आवाहनही यावेळी वळसे-पाटील यांनी केलं.
मोठ्या प्रमाणात आंदोलक असल्यामुळे पोलिसांची ताकद कुठेतरी कमी पडत आहे. यामुळे अधिक पोलिस बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. खरंतर, अमरावतीच्या या हिंसक वळण यामागे काही राजकीय नेत्यांचा किंवा पक्षाचा, संघटनेचा हात आहे का? असा प्रश्न विचारला असता जर असं काही असेल तर त्यावर कठोर चौकशी होईल. याबद्दल अधिक तपास केला जाईल आणि चुकी असणाऱ्याला कठोर शिक्षाही करण्यात येईल असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण देण्यात आलं. काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यामागे एका राजकीय पक्षाचा हातही असतो ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. राजकीय पक्षाचा असा फायदा घेणे हे योग्य नाही सगळ्यांनी समजून घेत शांततेत आंदोलन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या घटनेचा खरंतर आज निषेध व्यक्त करण्याची काही गरज नव्हती. कारण या घटनेला आधीच बरेच दिवस उलटून गेले आहेत. पण काही समाजकंटकांनी हे बंद सुरू असताना दगडफेक केले. यावेळी लोकांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे का? असं विचारलं असता यावर कठोर चौकशी करण्यात येणार असून आरोपींवर किंवा दोषींवर कारवाई केली जाईल असेही वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times