हायलाइट्स:
- जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
- चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांचा खात्मा
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पोलिसांचं कौतुक
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगुल जंगल परिसरात आज शनिवारी सकाळी पोलिसांचं सी-६० पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. यावेळी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं.
राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचं गृहमंत्र्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times