मुंबई: गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात पाण्याच्या टाकीत पडून एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
शिवाजीनगर येथील हनुमान मंदिराजवळ प्लाॅट क्रमांक ४० येथे राहणारा आरिफ नसुल्ला शेख हा चार वर्षांचा मुलगा पाण्याच्या टाकीत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी या मुलाला घाटकोपर येथील राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times