दरम्यान, याच निमित्तानं सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही एका व्हिडिओद्वारे संदेश दिला. मीडियानं खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याचं आवाहन करताना अनुराग ठाकूर या व्हिडिओत दिसले. ‘मीडिया एक नियंत्रण संस्था आहे. भारताच्या जिवंत लोकशाहीत मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असते’ असंही ठाकूर यांनी यावेळी म्हटलं.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेची स्वतंत्रता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ नुसार देण्यात आलेल्या अभिव्यक्तीच्या मूळ अधिकारात सुनिश्चित करण्यात आलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times