वाचा:
भारतात ”बाधित रुग्ण आढळून आल्यापासून अफवांचं पेव फुटलं आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनावश्यक माहिती शेअर केली जात आहे. त्यात आता करोनाबाधित रुग्णांची नावे शेअर करणाऱ्यांची भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे. ‘अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. आपत्तीच्याप्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावे उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कोणीही नावे उघड करता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.
वाचा:
‘कुणाचीही नावे किंवा चुकीच्या गोष्टी शेअर केल्या जाऊ नयेत असं आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत आहोत. परंतु सोशल मीडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस विभागाचा सायबर सेल लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवित असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असं म्हैसकर म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times