महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून या निवडणुकीत तीन उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यापैकी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तिसऱ्या उमेदवारावर भाजपमध्ये बराच खल सुरू होता. या जागेसाठी एकनाथ खडसे, माजी मंत्री हंसराज अहिर व पुण्याचे भाजपचे नेते संजय काकडे यांच्या नावांची चर्चा होती. पक्षावर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या खडसे यांचं नाव या शर्यतीत सर्वात पुढं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीनं संसदीय बोर्डाकडं खडसेंच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, खडसे यांना संधी मिळू शकली नाही. त्यांच्याऐवजी भाजपचे मराठवाड्यातील नेते डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे.
वाचा:
वाचा:
वृत्तवाहिन्यांशी बोलताना खडसे यांना यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय त्यांनी घेतला. राज्याच्या राजकारणात मला जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही हे मी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळं माझ्या नावाची चर्चा असली तरी मला अपेक्षा नव्हती.’
पक्षानं तुमची नाराजी दूर करण्याची संधी घालवली असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नावर काहीही बोलण्याचं खडसे यांनी टाळलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times