आणखी एका ट्विटमध्ये अमित शहा म्हणतात, ‘कृषी कायद्यांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली घोषणा एक स्वागतार्ह पाऊल आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले, भारत सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेत कायम राहील आणि त्यांच्या प्रत्यांनात नेहमीच त्यांचं समर्थन करेल’.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या निर्णयाचं स्वागत करत पंजाबची मागणी पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. तर, दुसरीकडे ‘आंदोलन तत्काळ मागे घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू जेव्हा कृषी कायदे संसदेत रद्द केले जातील. सरकारनं किमान हमीभावासोबत (MSP) शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी’ असं म्हणत तत्काळ शेतकरी आंदोलन स्थगित करण्यास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी नकार दिलाय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times