हायलाइट्स:
- मध्य प्रदेशातील भिंडमध्ये ‘एका लग्नानंतर दुसऱ्या लग्नाची अजब गोष्ट’
- घटस्फोट न घेता पत्नीने केले दुसरे लग्न
- पहिला पती थेट पोलीस ठाण्यात पोहोचला
- माझी पत्नी मला परत मिळवून द्या, पतीची पोलिसांना विनंती
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मेहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडलाय. तरुणाचे लग्न ४ मार्च २०१७ मध्ये भिंड येथील तरुणीशी झाले होते. लग्नानंतर महिला जवळपास एक वर्ष सासरी राहिली. तो दिल्लीत नोकरी करतो. काही दिवस ती आपल्या पतीसोबत दिल्लीत राहिली. त्यानंतर ती आपल्या माहेरी येऊन राहत होती. त्यानंतर ती पुन्हा सासरी गेलीच नाही. माहेरी राहिल्यानंतर ती आपल्या पतीकडून महिन्याच्या खर्चासाठी पैसेही घेत होती.
महिलेच्या दुसऱ्या पतीने सांगितले की, तिचे पहिले लग्न झाले आहे याबाबत मला काहीच माहिती नव्हते. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली असल्याचे पोलीस उपअधीक्षक थापा यांनी सांगितले. महिलेने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
महिलेने दुसरे लग्न केले. तर पहिल्या पतीसोबत राहायचे नाही, असे तिने पोलिसांत सांगितले. तो मला आवडत नाही, असे तिने स्पष्ट सांगितले आहे. मात्र, मला माझी पत्नी हवी आहे, असे पहिल्या पतीचे म्हणणे आहे. कारण ती त्याच्याकडून महिन्याचा खर्च घेत आहे. तिने दुसरे लग्न केले आहे, हे त्याला माहीत नव्हते. तरीही तिने दुसरे लग्न केले आहे. घटस्फोट झाला नाही तर ती दुसरे लग्न कसे करू शकते, असे त्याचे म्हणणे आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times