काय आहे राजीनाम्याचं कारण?
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेक्ष लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना लिहिलेल्या पत्रात आपण प्रकृतीच्या कारणास्तव हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून कर्जतमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात वेगळीही चर्चा होत आहे. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध माजी आमदार सुरेश लाड असाच संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. त्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र असले तरी कर्जत मतदारसंघात मात्र या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होत होता. तसंच सुरेश लाड यांचं नाव सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठीही चर्चेत होतं.
दरम्यान, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीसाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times