आंदोलकांनी आज राज्य शासनाने पगार वाढ नसून पगार वाढीचा गाजर दिलं अशी भावना व्यक्त करत बोंब मारून राज्य सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानात सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आलं आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी याबाबत आज घोषणा केली आहे. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यात सुरू असलेले आंदोलन मागे घ्यायचे की नाही याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी ठरवायचा आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजपनं पाठिंबा दिला होता. तर, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात कामगारांसोबत ठिय्या मांडला होता. सरकारने घेतलेल्या पगारवाढीच्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times