सोलापूर : मुंबई आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी माघार घेतली आहे. खोत आणि पडळकर यांच्या माघारीनंतरही महाराष्ट्राच्या जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम आहे. फक्त पगारवाढ नाही तर विलनीकरणाचीही मागणी केली असल्यामुळे एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

या आंदोलनामुळे राज्यातील ६५ लाख एसटी प्रवाशी वेठीला आहेत. यामुळे सरकारच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. एसटी विलीनीकरणच्या मुद्द्यावर नांदेड येथील एसटी कर्मचारी देखील ठाम असून जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

महाराष्ट्र हादरला! औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमाने गाडीवर बसवलं आणि…
आंदोलकांनी आज राज्य शासनाने पगार वाढ नसून पगार वाढीचा गाजर दिलं अशी भावना व्यक्त करत बोंब मारून राज्य सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानात सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आलं आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी याबाबत आज घोषणा केली आहे. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यात सुरू असलेले आंदोलन मागे घ्यायचे की नाही याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी ठरवायचा आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजपनं पाठिंबा दिला होता. तर, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात कामगारांसोबत ठिय्या मांडला होता. सरकारने घेतलेल्या पगारवाढीच्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी संपाबाबत मोठी बातमी! आझाद मैदानावरील आंदोलनातून बाहेर पडण्याची खोत-पडळकरांची घोषणा

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here