जगावर करोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशात आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलं. त्याला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद पाहिल्यानंतर आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले.
इथेच समाधान मानून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत पूर्णपणाने अशाच प्रकारची भूमिका घेण्याचं सूचवलेलं आहे. त्यांना आपण सगळे जण साथ देऊ या आणि सर्वसामान्य माणसाला यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहनही शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times