उत्पन्न घटल्याने कर्जफेडीबाबत चिंता
ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचं कर्ज आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांनी हे पाउल उचललं असावं, असा अंदाज कुटुंबियांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मृत ज्ञानेश्वर पाटील यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.
Home Maharashtra अवकाळी पावसाचा बळी; नुकसानीमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने संपवलं जीवन! – the farmer...
अवकाळी पावसाचा बळी; नुकसानीमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने संपवलं जीवन! – the farmer committed suicide by hanging himself from a tree in his field
जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तोंडापूर इथं ही घटना घडली. शेतकऱ्याने आपल्याच शेतातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास जीवन संपवलं. ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील (वय ४७) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. (महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या)