Msrtc Strike News : ‘फाशीची शिक्षा दिली तरी मागणी विलिनीकरनाचीच’, एसटी कर्मचाऱ्यांची कठोर भूमिका – msrtc strike news st staff insists on merger amravati news live today
अमरावती : एसटी कर्मचारी मागील २८ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने त्याच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण हाच एक पर्याय आता एसटी कर्मचाऱ्यांनी शासनापुढे ठेवला आहे. मेस्मा टाळा लावा किंवा आम्हाला फाशी द्या. मात्र, विलीनीकरणाशिवाय माघार नाही असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतल आहे.
जिल्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या संप मोडीत काढण्यासाठी विविध युक्त्या लढविण्यात येत आहे. आम्ही धोरणाचा निषेध करतो असे वक्तव्य एसटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. शासनाने आमचा अंत पाहू नये व सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. आम्ही संपर्क तात्काळ संपवू इच्छितो. मात्र. आमचे विलीनीकरण करा तशी भूमिका आता या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. औरंगाबादकरांनो, ऐकलंत का! करोनाचं टेन्शन सोडा, जिल्ह्यातून आली दिलासादायक बातमी फडणवीसांची सरकारवर टीका
औरंगाबाद इथं विभागीय बैठकीसाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत सरकारीची भूमिका लोकशाही विरोधात आहे. तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत नाही. मात्र, विरोधी पक्ष म्हणून भरपुर सहकार्य आम्ही केलं. तरी देखील सरकराने जे दोन पाऊल पुढं यायला पाहिजे ते येत नाहीत,असे फडणवीस म्हणाले.
तर काल देखील एका एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीत, त्यामुळे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत ‘मेस्मा’ लावण्याऐवजी चर्चेतून प्रश्न सोडवावा असेही फडणवीस म्हणाले.