हायलाइट्स:

  • परदेशातून रत्नागिरीत आले ७४ प्रवासी
  • रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरू
  • जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिल्या खबरदारीच्या सूचना
  • लांजा आणि गुहागरमध्ये एकही परदेशी नागरिक आलेला नाही

रत्नागिरी: ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या भीतीने राज्य सरकारसह सर्वच स्थानिक यंत्रणा खबरदारी घेत आहेत. मुंबई महापालिकेने ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अॅक्शन प्लान तयार केला आहे. दुसरीकडे, मुंबईत कालपर्यंत २८ ओमिक्रॉन संशयित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली होती. त्यातच आता रत्नागिरी जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. रत्नागिरीत परदेशातून आतापर्यंत ७४ प्रवासी आले आहेत. त्यांचा आरोग्य यंत्रणांमार्फत शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. जवळपास २६ जण हे एकट्या रत्नागिरी तालुक्यात आले आहेत. तर जिल्ह्यात एकूण ७४ प्रवासी परदेशातून परतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खबरदारीसाठी महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद ठेवून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ७४ नागरिक परदेशातून आले आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

धक्कादायक! नवी मुंबईत ओमिक्रॉनचा शिरकाव होण्याचा धोका; कारण…
Omicron : कल्याण-डोंबिवलीत परदेशांतून आलेल्या ‘त्या’ ७६ जणांचा शोध सुरू

कशी घेतली जातेय काळजी?

परदेशातून आलेल्या नागरिकांनी आठ दिवस घराबाहेर पडू नये, लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. परदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात ७४ नागरिक आतापर्यंत आलेले असून, सरकारकडून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात परदेशांतून आलेल्यांपैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक जात म्हणजे २६ नागरिक आलेले आहेत. मंडणगडमध्ये २, चिपळूण १० ,दापोली १२, खेड १९, संगमेश्वर ४ ,राजापूर १ प्रवासी आला आहे. लांजा आणि गुहागरमध्ये एकही परदेशी नागरिक आलेला नाही. या आलेल्या नागरिकांनी आठ दिवस आपल्या घरातच राहायचे आहे. काही लक्षणे आढळल्यास संबंधित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. या लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी आठव्या दिवशी चाचणी करून घ्यायची असून, घराबरोबरच गावातील लोकांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

‘ओमिक्रॉन’ला रोखणार; मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान; विदेशांतून येणाऱ्यांसाठी ‘हा’ पंचसूत्री कार्यक्रम
Omicron : ‘ओमिक्रॉन’ला रोखण्यासाठी मुंबईत अशी केलीय ‘जम्बो’ तयारी

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here