दरम्यान, करोना या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे राज्यात आधीच चिंतेचं वातावरण आहे. यावर चिंता करण्याची सोडून काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशात गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात करोना विषाणू (कोविड-१९) साथीचे ४१ नवीन रुग्ण आढळून आले असून यादरम्यान या साथीच्या आजारामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी यासंबंधी माहिती दिली.
मराठवाड्यातील आठ जिल्हा मुख्यालयातून मिळालेल्या अहवालानुसार, औरंगाबाद जिल्ह्यात करोनाचा धोका जास्त आहे. इथं १७ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीत दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, लातूरमध्ये सात, जालना आणि बीडमध्ये प्रत्येकी पाच, परभणी आणि नांदेडमध्ये प्रत्येकी तीन आणि उस्मानाबादमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. या दरम्यान हिंगोलीत एकही प्रकरण समोर आलेले नाही.
Chandrapur : कबड्डी सामना सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली; सात जण जखमी